Govind prabhu aarti,govind prabhu avataar din
श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले .
श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल निधन पावले . तेव्हा ऋद्धिपूरात राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी मुंजिबंधन करून त्यांना संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) . पुन्हा ॠद्धिपूराला येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत .
श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्तन करीत असले तरी त्यांच्या मूळ ज्ञानमय स्वरूपास अज्ञानत्व येत नाही . असे वर्तन करणे हे त्यांचे नाटक असते , तेथे वास्तवता नाही हे त्यांच्या लीलाचरित्रावरून कळून येईल , श्री गोविंदप्रभूचे सारे आयुष्य चमत्कारिक लीला व हास्य विनोद करण्यात गेले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, माणुसकी शिकविली , चातुर्वण्यता नष्ट केली , स्वामी श्रीचक्रधरांनी सांभाळी घातलेल्या परिवाराला प्रेमळपणाने वागविले . त्यांना कोणतेही उणे भासू दिले नाही, इत्यादी कार्ये त्यांच्या ज्ञानमय स्वरुपामुळे घडली अशी अलौकिक शंभर वर्ष व्यतीत करून त्यांनी शके १२०९ मध्ये आपला अवतार संपविला .
लिहण्यात चुकल्यास क्षमस्व
दंडवत प्रणाम
Aarti link:
https://youtu.be/Mv8q6mhXlns
Ram fajge....
श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले .
श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल निधन पावले . तेव्हा ऋद्धिपूरात राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी मुंजिबंधन करून त्यांना संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) . पुन्हा ॠद्धिपूराला येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत .
श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्तन करीत असले तरी त्यांच्या मूळ ज्ञानमय स्वरूपास अज्ञानत्व येत नाही . असे वर्तन करणे हे त्यांचे नाटक असते , तेथे वास्तवता नाही हे त्यांच्या लीलाचरित्रावरून कळून येईल , श्री गोविंदप्रभूचे सारे आयुष्य चमत्कारिक लीला व हास्य विनोद करण्यात गेले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्यात लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला, माणुसकी शिकविली , चातुर्वण्यता नष्ट केली , स्वामी श्रीचक्रधरांनी सांभाळी घातलेल्या परिवाराला प्रेमळपणाने वागविले . त्यांना कोणतेही उणे भासू दिले नाही, इत्यादी कार्ये त्यांच्या ज्ञानमय स्वरुपामुळे घडली अशी अलौकिक शंभर वर्ष व्यतीत करून त्यांनी शके १२०९ मध्ये आपला अवतार संपविला .
लिहण्यात चुकल्यास क्षमस्व
दंडवत प्रणाम
Aarti link:
https://youtu.be/Mv8q6mhXlns
Ram fajge....
Comments
Post a Comment